नवी दिल्ली : नवी दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारणी मेळावा पार पडला होता. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजप पक्षावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
शरद पवार यांचा टोलाः
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, त्यामुळे दिल्ली समोर झुकणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात टीकेचा बाण सोडला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी येतील, त्या त्यावेळी राष्ट्रवादी लढण्यासाठी मैदानात उतरेल, असंही पवार म्हणाले. देशात अल्पसंख्यक समाजाबद्दल विरोधाचे वातावरण तयार केले जात आहे. संसदेत तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा करण्यात आली नाही जगाने दिल्लीच्या सीमेवर शांततेत सुरू होतं, असं देखील पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | “सदा सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करा”, शिवसेनेची मागणी
- Srikant Shinde | “मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”; श्रीकांत शिंदेंची विरोधकांवर टीका
- Shrikant Shinde | ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है – श्रीकांत शिंदे
- Prasad Laad | “जनतेच्या कामांना तुम्ही नाकारलं म्हणून…”, भाजप नेते प्रसाड लाड यांची ट्विटद्वारे टीका
- Chandrakant Patil | “सुप्रिया ताई तुम्ही काळजी करु नका, सरकार…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

