Share

कर्मवीरांच्या रयतमध्ये खळबळ; ‘त्या’ दोन पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांनी राजीनामा केला मंजूर

Published On: 

🕒 1 min read

सातारा : रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातील जाळं हे फार मोठं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये रयतचं नाव घेतलं जातं. आता ही शिक्षण संस्था वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.

यानंतर उमटणारे प्रतिसाद व इतर काही प्रतिकूल परिणाम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाऊले उचलल्याचं बोललं जात आहे. शरद पवार या घटनेनंतर तेहत साताऱ्यात दाखल झाले. यामागे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी दिलेला तडकाफडकी राजीनाम्याचं कारण होतं. इतकंच नाही तर रयतला यानंतर आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे माजी सचिव अरविंद बुरुगले यांनीही साताऱ्यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा दिला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही संस्था महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात स्वतः जाऊन पोहोचवली. आज समाजात दिसणारे अनेक उच्च अधिकारी, यशस्वी उद्योजक, प्रमुख राजकारणी व्यक्तींनी याच शिक्षण संस्थेतून शिक्षण घेत आपल्या आयुष्याचा पाया घडवला. मात्र, आता या दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय असल्यानेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात दाखल झाले होते. या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा संशय येताच पवारांनी स्वतः लक्ष घालून गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!