Share

‘देशाच्या संपत्तीची विक्री, आमदारांची खरेदी, इतकंच अर्थशास्त्र भाजपला कळतं’; राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : केंद्राने नुकताच एक नॅशनल मॉनिटायझेश प्लॅन जाहीर केला आहे. ज्यामध्ये खाजगी क्षेत्राशी संलग्न होऊन ६ कोटी रुपयांची मालमत्ता भाडेतत्वावर देऊन कमाई केली जाईल. त्यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये केलेली देशातील कमाई भाजप सरकार विकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. परंतु, ही मालमत्ता विकत नसून फक्त भाडेतत्वावर देणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामधून मिळालेल्या पैशाने देशाचा विकास केला जाईल, असेही केंद्र सरकारने म्हंटले आहे. त्यावर आता काँग्रेसने टीका केली आहे.

यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. त्यातच आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘देशाच्या संपत्तीची विक्री आणि आमदारांची खरेद, इतकंच काय ते अर्थशास्त्र भाजपला कळतं’, असं म्हणत नितीन राऊतांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. याबाबत नितीन राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. केंद्र सरकार विक्री करण्यात व्यस्त आहे, असं जनतेला आवाहन करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!