टीम महाराष्ट्र देशा : सरकारच्या खोट्या लटक्या वृक्ष लागवडीच्या निर्धारावरून अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारला चांगलचं फैलावर घेतले आहे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 5 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड होत असल्याचा आरोप सयाजी शिंदे यांनी केला आहे.
यावेळी सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब सरकारने द्यावा.
तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे, असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
- मुख्यमंत्र्यांकडे असणारं गृहखात बिनकामाचं, अजित पवार संतापले
- शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु, मराठवाड्यासह नगरमध्ये घुमणार अमोल कोल्हेंचा आवाज
- पैज लावतो ! राहुल आणि प्रियांका गांधी यांनी कधी रक्षाबंधनचं केले नाही’
- जम्मू काश्मीरमध्ये शांतता कायम, दूरध्वनी आणि 2 जी इंटरनेट सेवा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

