सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत. मुंबई, कोकणसह विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.
तर, भाजपने देखील आता शिवसेनेसह मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या २ दिवसांच्या राजकीय नाट्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाद्वारे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे! कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही,’ अशी टीका आज सामनातून करण्यात आली.
याला भाजप नेते प्रमोद जठार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाने मूक मोर्चा काढला होता. त्यात माता भगिनीही सामील झाल्या होत्या. मात्र त्यावेळी सामनाच्या मुख्य पानावर व्यंग चित्र छापत मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’, असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘जयंतरावांना करेक्ट कार्यक्रम करण्याची आवड, त्यांना सांस्कृतिक मंत्री करा’
- जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार – प्रमोद जठार
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

