🕒 1 min read
मुंबई: विधान परिषदेचा निकाल लागला आणि राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या हालचाली झाल्या. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारला आहे. सेनेतील अंतर्गत फुट आज महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसून येत आहे. सर्व आमदारांसोबत एकनाथ शिंदे गुवाहाटीला (Guwahati) दाखल झाले आहेत. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर व आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे. अशी टीका करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच ‘पॅटर्न’ महाराष्ट्रात वापरायचा व स्वतःला ‘किंग मेकर’ म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. ‘विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे. आता आम्ही मुंबई जिंकू. मुंबईवर ताबा मिळवू,’ अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली, यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा, हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वतःला ‘मावळे’ म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट-कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत. महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : राज्यपाल कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह; एकनाथ शिंदे मुंबईला येणार का?
- Bhagat Singh Koshyari corona positive – राज्यपाल कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह
- Bacchu Kadu : 36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू
- Sachin Sawant : सत्तापिपासू, कुटील आणि निर्दयी हे भाजपचे समानार्थी शब्द; ‘काँग्रेस’चा टोला
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी राज्यपालांना भेटण्याची शक्यता; राजकीय चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
