Share

“विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यू’च्या कत्तली केल्या तसे…”, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाडय़ात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे, विरोधात उठलेला प्रत्येक श्वास बंद करायचा हीच नवी लोकशाही उदयास आली आहे. बुलडोझर फक्त घरांवरच फिरतो असे नाही, तो व्यक्तीच्या नागरी अधिकारांवर आणि देशाच्या स्वातंत्र्यावरही फिरताना स्पष्ट दिसत आहे. आज राहुल गांधी, उद्या सोनिया गांधी, त्यानंतर आणखी कोणी! विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यू’च्या कत्तली केल्या तसे ‘विषारी गॅस चेंबर्स’ निर्माण करणे तेवढेच बाकी आहे. राजकीय सूडाची पावले त्याच दिशेने पडत आहेत. देशात कायद्याचे राज्यच राहिले नाही, तेथे ‘कायदा सर्वांसाठी समान’ या बोलण्यास काय अर्थ? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.

देशाचा राजकीय मौसम बदलला नाही तर आपण सगळेच कायमचे अंधाऱ्या गुहेत ढकलले जाऊ असेच वातावरण निर्माण झाले आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी साडेआठ तास चौकशी झाली. ‘नॅशनल हेराल्ड’ हे स्वातंत्र्य संग्रामात लढणारे वृत्तपत्र होते. पंडित नेहरूंनी या वृत्तपत्राची स्थापना केली. हे वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले, तेव्हा कॉंग्रेसने ‘कर्ज’ देऊन ही संस्था वाचवली. हे सर्व प्रकरण मनी लॉण्डरिंगच आहे असे ‘ईडी’ने ठरवले व राहुल तसेच सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले.

सोनिया गांधी या कोविडमुळे इस्पितळात दाखल आहेत, राहुल गांधी ‘ईडी’समोर हजेरी लावत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते व असंख्य कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निषेध करीत आहेत. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा सत्याग्रह हा तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. “कायद्याच्या वर कोणी नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत.” असेही सौ. इराणी म्हणतात ते खरेच आहे, पण भाजपपुढे कायदा आज खुजा झालेला दिसतोय. शिवसेना, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्याच मागे ‘ईडी’ वगैरेचा ससेमिरा लागलेला आहे. हे लोक त्यांच्या घराघरात घुसतात, तसे कुण्या भाजपवाल्यांच्या घरात घुसल्याचे कधी दिसले नाही. अलीकडेच जे ‘आयपीएल’चे सामने पार पाडले, त्यात पुढे व मागे जे आर्थिक व्यवहार पार पडले, त्यात मोठया उलाढालीमागे कोण होते, हा ‘ईडी’ सारख्या संस्थासाठी संशधनाचा विषय आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!