मुंबई: राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोब फुटले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण त्यामुळे आकाश कोसळले काय? मुंगीने मेरू पर्वत गिळला काय? छे, छे! असे अजिबात झाले नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष व छोटया पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्याचे गणित भाजपच्या बाजूने गेले व त्याचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले, अर्थात जो जिता वही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय
- ENG vs NZ : नाद नाद नादच..! जो रूटनं पुन्हा ठोकलं शतक; विराट आणि स्मिथची केली बरोबरी!
- IND vs SA : भारताचं दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांचं लक्ष्य; ‘फिनिशर’ दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण खेळी!
- PAK vs WI : आपली बॅटिंग भारी अन् बॉलिंग लय भारी..! ४ विकेट्स घेत निकोलस पूरननं उडवली पाकिस्तानची भंबेरी
- “आयपीएल स्पर्धा EPL पेक्षा जास्त कमाई करते”, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा दावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

