🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात २८० सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली ५६ वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये ‘डोंगर, झाडी, नदी, हाटील’ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व ‘हाटील, डोंगर, झाडी’त बसलेल्या आमदारांवर ११ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एक प्रकारे ‘दिलासा’च आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच,” असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन ११ जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना ‘डोंगर-झाडी-हाटील’मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजपा नक्की कोठे आहे? भाजपा म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजपा आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना व नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल,” असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- “हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!’’ शाब्बास पठ्ठ्या! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते व बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sandeep Deshpande : ‘काळजी’च्या नावाने उद्धव ठाकरे पाहात आहेत त्यांचा स्वार्थ?; ‘मनसे’चा व्यंगचित्रातून प्रहार
- IRE vs IND 2nd T20 : आयर्लंडनं भारताला फोडला घाम..! हार्दिकसेनेचा २-० असा मालिकाविजय
- Maharashtra Crisis : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाखाली FIR नोंदवण्याची मागणी
- Special Session : 30 तारखेला राज्यपाल बोलावतील विशेष अधिवेशन? ठाकरे सरकारकडे फक्त उद्याचा दिवस!
- Devendra Fadnavis : ठाकरे-शिंदेंच्या सत्तासंघर्षामध्ये भाजप मैदानात! राज्यपालांना पत्र दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
