🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या धार्मिक मुद्द्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत मोठी भूमिका मांडली होती. १ मे रोजी त्यांनी औरंगाबादेत सभा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारला भोंगे उतरवण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच रंगले आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज (३ मे ) ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला. “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
निकले हैं वो लोग हमारी शख्शियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं.@CMOMaharashtra @PawarSpeaks
@— Sanjay Raut (@rautsanjay61) May 3, 2022
राज्यातील मविआ नेत्यांवरील ईडीच्या कारवाया, भाजपकडून केले जाणारे आरोप यामुळे मविआ सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यातच धार्मिक तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण विरोधक बिघडवत असल्याचा आरोप मविआ नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान आज राज ठाकरेंनी दिलेली मुदत संपणार आहे. आता राज्य सरकार भोंग्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे ४ तारखेनंतर अजिबात ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरुध्द विरोधक असा संघर्ष अटळ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज”, संजय राऊत यांचा खोचक टोला
- “चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावलेत मग…”, संजय राऊतांचे थेट आव्हान
- “भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- “संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

