🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. दरम्यान,गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाल्यानंतर १७ मार्च रोजी ते नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी बोलत असतांना महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजप सरकार पहायला मिळेल, असा दावा फडणवीसांनी केला. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘गोवा जिंकून आल्यापासून त्यांचे मनोबल वाढले असून गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचे राजकारण कळले नाही.’ तसेच राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावं, असा सल्लाही यावेळी संजय राऊतांनी दिला.
दरम्यान, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे.तसेच राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात,असेही फडणवीस यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- शोएब अख्तरचे सेहवागबाबत धक्कादायक वक्तव्य; म्हणाला “मैं एक दिन बोहोत मारुंगा”
- ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर मोहन भागवतांची प्रतिक्रिया…
- होळीच्या निमित्ताने धोनीकडून रांचीतील लोकांना विशेष भेट; चाहते सुखावले!
- सोलापूरच्या शहिद जवान रामेश्वर काकडेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!
- Pakistan Missile Test: हवेत झेपावताच पाकिस्तानची मिसाईल झाली फुस्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
