Share

“भाजपने नक्कीच जागा जिंकली पण…”, शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार अर्थातच पक्षाचे आमदार तिकडे गेले नाही तर काही अपक्ष आमदार त्यांच्याकडे गेले. काही जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्यात आला. तर कुठे वेगळे व्यवहार झाले. आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली. तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो होतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!