मुंबई – देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत. भाजपाने कडवी टक्कर दिली असून सुरुवातीच्या कलांमध्ये एक आणि दोन आकड्यांच्या फरकाने तृणमूल पुढे असल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली होती. ममता बॅनर्जींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी, आणि मोदींनी सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले पहायला मिळाले. या आठही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारदेखील पहायला मिळाला. कोरोना काळातही मोदींच्या सभा, ममतांवर झालेला कथित हल्ला या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
दरम्यान,निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेवून जास्त लसीकरणाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सुचना
- ‘घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयात हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा’
- सुरवातीच्या कलांनुसार बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; नंदीग्राममधून बॅनर्जी १५०० मतांनी पिछाडीवर
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

