Share

“भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू”, संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात ‘फाळणीपूर्व’ परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. डॉ. अभय बंग यांचे म्हणणे असे की, संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडविण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य, नाटक व इतर साधनांचा वापर केला. डॉ. बंग यांनी जे विचार व्यक्त केले ते ‘जेएनयू’पासून कर्नाटकपर्यंत खरे होताना दिसत आहेत. धार्मिक द्वेषाचे राजकारण देशाचे पुन्हा तुकडे तुकडे करील. बालमनावर रुजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल, असे डॉ. बंग सांगतात. त्याआधी असंख्य फाळण्यांचे बीजे रुजलेली असतील. नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल काय?’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू आहे हे आता स्पष्टच झाले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून दंगली घडविण्यापर्यंत या मंडळींचा हातभार असतो हा संशय गडद होत आहे. एका बाजूला अखंड हिंदुस्थानचे गिरमिट चालवायचे व दुसऱ्या बाजूला धर्मांध तेढ निर्माण करून देशाचे तुकडे तुकडे होतील असे वातावरण निर्माण करायचे याला हिंदुत्व किंवा हिंदू संस्कृती म्हणता येणार नाही. ‘भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नव्हे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा म्हणाले आहेत ते यामुळेच. भाजपला हिंदुत्वाशी घेणेदेणे नसून हिंदू-मुसलमानांत सदैव झगडा, त्यातून तणाव आणि अस्थिरता, त्याच तणावात हिंदू भावनांना हात घालून निवडणुका जिंकायच्या यापलीकडे यांच्या हिंदुत्वाची मजल नाही. त्याचे ताजे रटरटीत उदाहरण म्हणजे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपच्या विद्यार्थी संघटनेने केलेली हिंसा व राडा.’

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!