मुंबई : कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.
त्यात आता शिवसेना खा. संजय राऊत यांनी ट्विट करत विरोधकांना टोला लगावला आहे. करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है.
विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील . Boomerang… जय महाराष्ट्र असे लिहित राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.
करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है.
विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे..
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील .
Boomerang…
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार निष्क्रिय आहे, असा आरोप भाजप वारंवार करत आहे. मात्र भाजपच्या या आरोपाचा कोणताच परिणाम आम्हाला होत नसल्याचं सत्ताधारी दाखवत आहेत. उलट भाजप या संकटात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यावरच संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काय म्हणता !… ‘ही’ राजकीय चर्चा झाली शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीमध्ये ?
चित्रपट दिग्दर्शक करण जोहरकडे घरकाम करणाऱ्या दोघांना ‘कोरोना’ची लागण
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास गुप्त चर्चा, बैठकीबाबत राऊतांकडून मोठा खुलासा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यात बैठक, पुन्हा होणार राजकीय भूकंप?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

