Share

Sadabhau Khot : “… तर तुमच्या बुद्धीची कीव येते”, सदाभाऊ खोत यांचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केला असून असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. “बरं झाली घाण गेली”, अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांना टोला लगावला. यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.

“पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असे  आदित्य ठाकरे यांनी म्हटलेय. पण तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे ह्याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते..विनाशकाले विपरीत बुद्धी!”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी म्हटले कि, “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!