Share

पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?; ‘काँग्रेस’चा सवाल

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या पक्षनिष्ठेवर भाजपकडूनच प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे दिसून येते आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. तर यावरूनच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (sachin sawant) यांनी भाजपला सवाल केला आहे.

आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विरोधी पक्षनेते ‌प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कनेक्शनमुळे ते विरोध करत नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली. जर असे असेल तर बृजभूषण यांना पक्षातून निलंबित करावे. पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?”, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच आपल्या खासदारावरच शंका घेणे ही गंभीर बाब आहे. भाजपाचा उत्तर भारतीयांसाठी कळवळा ही खोटा दिसतो. “अयोध्या द ट्रॅप” या चित्रपटाचे कथानक भाजपानेच रचले व भाजपनेच रसद पुरवली या मताशी आम्ही ठाम आहोत. असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान काल (२२ मे) पुण्यातील भाषणात राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा यामागे सापळा असून त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला होता.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!