Share

ऋतुराज गायकवाड ऐन सामन्याआधी संघातून बाहेर ; बीसीसीआयने कारण सांगत दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ऋतुराज गायकवाड खेळणार असे स्पष्ट असताना तो खेळू शकला नाही. पहिल्या सामन्यात ऋतुराज खेळणार असल्याचे सगळ्यांना माहिती होते. मात्र त्याला पहिल्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. यासंबंधी चर्चाना पूर्णविराम लावत बीसीसीआयने कारण स्पष्ट केले आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकवेळी सांगितले की, गायकवाडला खेळायचे होते पण मनगटाच्या समस्येमुळे तो खेळु शकत नाहीये. तसेच बीसीसीआयने ऋतुराजच्या दुखापतीबाबत एक अपडेट ट्विट केले: “ऋतुराज गायकवाडने उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्याची तक्रार केली, ज्यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. तो पहिल्या T20 सामन्यातील निवडीसाठी अनुपलब्ध होता. बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे.”

भारतीय व्यवस्थापनाला चिंता आहे की ही फार मोठी दुखापत नसावी कारण जर गायकवाड गंभीर जखमी झाला असेल तर तो मालिकेतून बाहेर पडेल आणि सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर यांच्या यादीत येईल. जे त्यांच्या संबंधित दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय संघाने पहिला टी २० सामना जिंकला आहे. तरी भारतीय क्रिकेट रसिकांना दुसऱ्या सामन्यात ऋतुराजला खेळताना पाहायची आशा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!