मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. राजकीय पक्ष आणि अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापायला सुरु झाले आहे. दरम्यान यासाठी आता रायगड, ठाणे, पालघर, कल्याण याठिकाणी हि चळवळ निर्माण झाली आहे. येत्या २४ तारखेला प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला घेराव घालण्याचा देखील निर्धार केला असून भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तसेच यावेळी दरेकर बोलताना म्हणाले कि, ‘नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाजभूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असे दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक चिघळणार असल्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपत अंतर्गत कलह! पक्षातील नेत्याकडूनच तब्बल २१ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- नवनीत राणा यांची सुप्रीम कोर्टात धाव, ‘माझे जात प्रमाणपत्र वैधच, विजय सत्याचाच होणार!’
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
