Share

रोहित शर्माची कायम ठेवलेल्या खेळाडूंवर मोठी प्रतिक्रिया

Published On: 

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने (IPL 2022) च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या रिटेन केलेल्या खेळाडूंवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की मुंबई संघाला अनेक खेळाडूंना कायम ठेवायचे होते परंतु नियमांमुळे ते शक्य झाले नाही.

आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. मुंबईने तीन भारतीय आणि एका परदेशी खेळाडूला कायम ठेवले आहे. कर्णधार रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना मुंबई संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये किरॉन पोलार्डचा समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्माला 16 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. बुमराहला 12 कोटी आणि सूर्यकुमार यादवला 8 कोटी ठेवण्यात आले आहेत. पोलार्डला 6 कोटी रुपयांमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईने एकूण 42 कोटी रुपयांत एकूण चार खेळाडूंना आपल्या संघात ठेवले आहे.

रोहित शर्माने रिटेन केलेल्या खेळाडूंबद्दल दिली प्रतिक्रिया:
मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. रोहित शर्माने त्यात म्हटले आहे की, आपल्या खेळाडूंना सोडावे लागले हे त्याच्यासाठी खूप हृदयद्रावक आहे. या खेळाडूंनी संघासाठी खूप काम केले आहे. असे रोहित शर्मा म्हणाला.

‘टिकवण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्ससाठी हे सर्वात कठीण वर्ष होते. आमच्याकडे काही महान खेळाडू आहेत आणि त्यांना सोडताना मन हेलावणारे होते. या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून या फ्रँचायझीसाठी अनेक संस्मरणीय आठवणी निर्माण केल्या आहेत. आम्ही चार खेळाडू कायम ठेवले असले तरी आशा आहे की आम्ही एक उत्कृष्ट युनिट बनवू शकू.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!