अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार हे जुन्नर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले कि, “२०२४ नंतरची वेळ ही युवकांची असेल. तेव्हाचे निर्णय नवीन पिढी घेईल”, असं विधान त्यांनी केले होते. त्यावरूनच आता २०२४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
या सभेत बोलताना रोहित पवार असेही म्हणाले कि, “आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीची शिकवण स्वीकारुन ती आत्मसात केली आहे. २०२४ नंतरची वेळ ही युवकांची असेल. आपले दिवस आले की निर्णय सुद्धा आपणच घेणार, त्या निर्णयांमध्ये आपल्याला शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन असेलच, पण कोणतं पद कोणाला द्यायचं? आणि काम कसं करायचं?, याचे निर्णय मात्र नवीन पिढीला घ्यावे लागतील”. त्यांच्या याच विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. मात्र त्यांनी आता ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केले कि, “मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde । अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल वरून केली विचारपूस
- Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत
- Urfi Javed | उर्फी जावेदने घातला गुलाबाच्या पाकळ्यांचा ड्रेस; चाहते झाले घायाळ | पहा VIDEO
- Ravi Rana : “संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी, उद्धव ठाकरेंचं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील”, रवी राणांचा हल्लाबोल
- Anand Dave : पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं आणि महाराजांना न्याय द्यावा – आनंद दवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

