🕒 1 min read
अबुधाबी : काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही. आरसीबीने मुंबई इंडियन्सला फक्त 111 धावांवर सर्वबाद केलं. एवढेच नाही तर मुंबईची पहिली विकेट 57 धावांवर पडली, तर रोहित शर्मा स्वतः 79 धावांच्या एकूण धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाने 32 धावांच्या आत सर्व विकेट गमावल्या.
आरसीबीविरुद्धचा पराभव रोहितच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सामन्यानंतर रोहितने फलंदाजांना चांगलेच सुनावले आहे. पराभवानंतर रोहित म्हणाला, ‘आमच्या बाजूने हा एक चांगला गोलंदाजीचा प्रयत्न होता आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एका वेळी असे वाटले की आरसीबी180-प्लस धावा करत आहेत. या सामन्यात आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराशा केली. फलंदाजान सोबत याविषयी बोलावं लागणार आहे.
हिटमॅन पुढे म्हणाला, ‘आम्ही ज्या परिस्थितीत आहोत त्यापासून मागे हटण्याची गरज आहे. आम्ही हे पूर्वीही केले आहे. फक्त या हंगामात ते घडत नाहीये. ईशान किशन बद्दल बोलताना रोहित म्हणाला, तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. गेल्या वर्षीची आयपीएल त्याच्यासाठी लाजवाब होती. आम्हाला वाटते की त्याने त्याचा स्वाभाविक खेळ दाखवावा, ज्यासाठी आम्ही त्याला वरच्या फळीत सूर्यकुमार यादवच्या आधी पाठवत आहोत.
दरम्यान, आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आहे, पण हा हंगाम मुंबईसाठी विशेष राहिला नाही. मुंबईने आपले 10 साखळी सामने खेळले आहेत आणि आतापर्यंत केवळ 4 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु पुढील प्रवास खूप कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
