जयपूर : टी-20 विश्वचषकातील भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर काही क्रिकेट तज्ज्ञांनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलवर निशाणा साधला आहे. या खेळाडूंकडून अपेक्षा असतानाही हे खेळाडू उत्तम कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तसेच हे तिघे एकत्र खेळू शकत नाही, तरूणांना संघात आणले पाहिजे. अशी चर्चा देखील सर्वत्र चालू आहे.
मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला सहमत नाही. त्याचा असा विश्वास आहे की भारताकडे नक्कीच काही महान युवा खेळाडू आहेत परंतु आपण या तीन खेळाडूंना येणाऱ्या काळात लवकर बाहेर टाकू शकत नाही.
विश्वचषक विजेत्या पाँटिंगने ग्रेड क्रिकेटरशी संवाद साधताना याविषयी टिप्पणी केली आहे. ‘सध्याच्या खेळाडूंना मागे टाकता येईल का हे पाहण्यासाठी भारताने ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यासारख्या काही तरुण आयपीएल स्टार्सना मुख्य संघात आणण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला होता.’
या प्रश्नावर बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, ‘भारत काही तरुण खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न करू शकतो पण महत्त्वाचे खेळाडू संघाचे आधारस्तंभ म्हणून उपस्थित संघात असतील. पाँटिंग म्हणाला, ‘भारतीय संघात तरुण खेळाडू इशान किशन आणि सूर्यकुमार यादव होते, श्रेयश अय्यरही प्रवासी राखीव म्हणून सोबत होता. पण तुम्ही रोहित शर्मा, विराट किंवा केएल राहुलला यांसाख्या बड्या खेळाडूंना बाहेर टाकणार नाही.
Ricky joins us in the studio for an hour to discuss The Ashes, India’s scary future and getting a few. Available now on YouTube, Spotify, iTunes and all your usual places. pic.twitter.com/EUyPci5PXV
— The Grade Cricketer (@gradecricketer) November 17, 2021
भारतीय संघात हार्दिक पांड्या सारखा खेळाडू आहे पण जर तो गोलंदाजी करत नसेल तर मधल्या फळीतील तरुण खेळाडूंपैकी एकाचा वापर करू शकतो, पण हो, बरेच पर्याय आहेत. इतके चांगले तरुण खेळाडू की जेव्हा एखादा वरिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी करत नाही तेव्हा तुम्हाला वाटते ‘या युवा खेळाडूंना समाविष्ट करू’ पण, तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात.
दरम्यान,की पाँटिंगनेही भारताच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्यासाठी व्यस्त वेळापत्रकाला जबाबदार धरले. त्यांच्या मते, प्रवासामुळे आणि बराच वेळ बायो बबलमध्ये राहिल्याने खेळाडू थकले होते आणि त्यामुळे संघाची कामगिरी चांगली झाली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

