मुंबई: राज्यातील १४ जिल्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत विधान केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा संपूर्ण प्रस्ताव मांडला गेला आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांची यादी तयार करून ती सादर करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनावरील प्रभावी उपाययोजना कशाप्रकारे करता येतील याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.
राज्यातील कोरोना रुग्णवाढ दर हा ४.५ टक्के आहे. निर्बंधाचे पालन केल्यास हा दर आटोक्यात येऊ शकतो. तसेच राज्यात सध्या ४००० हून अधिक केंद्रांमधून लस दिली जात असून दिवसाला १२ लाख लोकांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सादर केलेला प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- गुजरात कॅडरचे IPS अधिकारी राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस कमिशनर
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

