🕒 1 min read
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात विविध मागणी व मुद्दे उपस्थित करुन औरंगाबाद-अहमदनगर दरम्यान ११५ किमी नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी १५ व १६ मार्च रोजी लोकसभेत मराठवाडा व औरंगाबादेतील रेल्वे विकास करण्याबाबत विविध मुद्दे उपस्थित करुन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद-अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, औरंगाबादला आधुनिक रेल्वे स्थानकासाठी मान्यता देण्यात यावी, औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग बांधण्यात यावा, औरंगाबादला पुण्याशी जोडण्यात यावे.
तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासात्मक कामासाठी वाढीव निधी देण्यात यावा, असे विविध मुद्दे उपस्थित करुन त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली होती. जलील यांनी मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे विभागाचे विकास होवून रेल्वेस्थानकांवर यात्रेकरुंना अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या यासाठी उपस्थित केलेल्या प्रस्ताव व विकास कामांबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुद्देनिहाय प्रस्ताव, मागण्या व कामांबाबत केंद्र शासनाच्या रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पत्राद्वारे खा. इम्तियाज जलील यांना कळविले आहे.
यात औरंगाबाद – चाळीसगाव नवीन प्रकल्पाची किंमत १६८९.५१ कोटी रुपये इतकी असुन नकारात्मक परतावा (-) २.२३ टक्क्यांसह असल्याने या प्रस्तावावर पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होवु शकली नाही. औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी (१५५ किमी) सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. अहमदनगर दौंड मार्गे यापूर्वीच पुण्याला जोडलेले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासाठी रेल्वे मंत्रालयाची मागणी क्रमांक ८४ च्या भांडवलाच्या अंतर्गत ३८७.५५ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा दूर करा, शिक्षक मंत्र्यांना साकडे!
- शिवसेना-युवासेनेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम, पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन
- पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल
- ‘छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती’ ; फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी नाशिक मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
