मुंबई : ‘मरता क्या न करता’ पूजा चव्हाण प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याची माहितीही मिळत आहे. पण असे असले तरी राठोड अजूनही हार मानण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्राचा वापर राठोड करत असल्याचे कळतेय. ‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचं राठोड यांनी पत्रकारांना सांगितले. राठोड यांनी सपत्निक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे.
संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. संजय राठोड यांचा दबावतंत्राचा काही उपयोग होणार का की मुख्यमंत्री तटस्थ निर्णय घेतील ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे विरोधी पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूजाच्या मृत्यूनंतर संजय राठोडांनी केल्या ‘या’ चुका, त्यामुळे द्यावा लागला राजीनामा
- ..तर संजय राठोड यांना आमदारकीही सोडायला सांगू-महंत जितेंद्र महाराज
- उल्टी गिनती सुरू! संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली
- गैरसोय दूर होणार, अहमदनगर-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
- मनसेचा आता परप्रांतीय बोअर वेल्सविरोधात एल्गारकेंद्र सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

