नाशिक : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघामधील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल बघायला मिळत आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्यामुळे राज्यभरात टोमॅटोला मातीमोल भाव मिळाला आहे.
कमी भाव मिळाल्याने संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत चालल्याने शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव २० ते ३० रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास १ ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळत आहे.
यावरुन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. ‘टोमॅटोचे भाव खूप कोसळले आहेत. वाहतूकही परवडत नाही. सरकारनं ठरवावं आणि भाव द्यावा. निव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये. राज्य सरकारनं सर्कस बनू नये आणि शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही, प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची तत्काळ मदत द्या. सरकारनं लक्ष दिलं नाही तर आंदोलन करु, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये बोलताना दिला.
अचानक भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सरकार आणि विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र आहेत. त्यांनी तो गोंधळ थांबवून ताबडतोब या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग यांना चालना देऊन टोमॅटोला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले पाहिजे. लाखो रुपये खर्चून पिकविलेला टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
राजकारणी आपले मानअपमान आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. सरकारने हा खेळखंडोबा थांबवावा. सहकार विभाग, कृषी विभाग, पणन विभाग यांनी एकत्र येऊन धोरण घ्यावे. कर्ज, अनुदान, मालाचे जतन यासंबंधी निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा कार्यालायावर हल्ला केला तर “ईट का जवाब पत्थर से देंगे”’; भाजपचा इशारा
- ‘कोरोना काळात राज्यात ६० कंपन्यांकडून दीड लाख कोटींची गुंतवणूक’, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार आणि विरोधक मात्र दुसऱ्याच गोंधळात; शेतकऱ्यांचा संताप
- ‘महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची गरज’-मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

