Share

दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथील कसोटी सामन्यातील खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता. अनेक खेळाडूंनी ही खेळपट्टी खराब असल्याची तक्रार केली होती. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्याचा निकाल दोनच दिवसात लागला होता. तर या मालिकेतील चौथा सामना तीन दिवसांमध्ये संपला होता.

यावर बराच वाद झाला होता, त्यामुळे आयसीसीने या खेळपट्टीची चाचणी करण्याचे ठरवले होते. आता आयसीसीने या खेळपट्टीवरचा आपला रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये आयसीसीने या खेळपट्टीला क्लीन चीट दिली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ही सरासरी होती असा शेरा आयसीसीने दिला आहे. त्यामुळे आता या मैदानावर कोणतीही कारवाई होणार नाही.

जर आयसीसीने या खेळपट्टीवर कारवाई केली असती, तर या मैदानाला एक नकारात्मक पॉईंट मिळाला असता. आयसीसी नियमाप्रमाणे जर एखाद्या ठिकाणाला ५ नकारात्मक पॉईंट मिळाले, तर त्याठिकाणी वर्षभर आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन होऊ शकत नाही. त्यातच जर नकारात्मक अंकाची संख्या १० झाली तर स्टेडियमवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. आयसीसीच्या या शेऱ्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला कोणताच दंड द्यावा लागणार नाही, तसंच पॉईंट्सही कमी होणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!