Share

लहान मुलांनी भीक मागणे हा कायद्याने गुन्हा; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

Published On: 

औरंगाबाद : राज्यात भीक प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील भिकाऱ्यांची संख्या लक्षात घेता, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सौरभ सुकाळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने राज्य शासनास नोटीस काढून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

सौरभ सुकाळे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, देशात चार लाख १७ हजार ७६० इतके भिकारी असून, राज्यात हीच संख्या २४ हजार २०७ एवढी आहे. भीक मागणे, लहान मुलांकडून भीक मागणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र, असे असूनही आज चौकाचौकात, बसस्टँडवर, मंदिरांसमोर अशा विविध ठिकाणी अनेक जण भीक मागताना दिसून येतात. राज्यात १४ भिक्षेकरीगृह असून त्यातील पहिले मुंबईत आहे. त्याची क्षमता ८५० भिकारी एका वेळी राहू शकतील, अशी असूनही तेथे केवळ सहा जण राहतात. राज्यातील इतर १३ भिक्षेकरीगृहांची परिस्थिती जवळपास अशीच असल्याचे सुकाळे यांनी खंडपीठात दाखल याचिकेत म्हले आहे.

भीक मागणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र भीक प्रतिबंधक कायदा कलम ४ आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २१ (अ), ३८ तसेच ४७ या तरतुदींचे पालन होताना दिसून येत नसल्याचे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ९ एप्रिलला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!