मुंबई: विराट कोहलीने नऊ वर्षांनी २०२१ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी अजूनही नवीन कर्णधारच्या शोधात आहे. विराटच्या जागी बँगलोरचे कर्णधारपद कोणाकडे असावे यावर भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने मोठे वक्तव्य केले आहे.
माजी खेळाडू अजित आगरकर यांचे मत आहे कि आरसीबीचे कर्णधारपद पुन्हा विराटकडे देण्यात यावे. ” जर विराट कोहली कर्णधारपद पुन्हा स्वीकारत असेल आणि त्याला हे करण्यात आनंद वाटत असेल , त्याच्याकडे ते करण्याची उर्जा असेल, तर मला वाटते की आरसीबीकडे हा सर्वात सोपा उपाय आहे,” विराटने मोठ्या कालखंडासाठी आरसीबीचे नेतृत्व केले आहे. मात्र त्याला एकदाही जेतेपद मिळवता आले नाही.
आयपीएलचे मेगा ऑक्शन काही दिवसांवर आहे. त्याआधी आरसीबीने विराट कोहली , ग्लेन मॅक्सवेल आणि मोहंमद सिराजला रिटेन केले आहे. आता आरसीबी मॅक्सवेलला कर्णधार करेल कि मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या नवीन खेळाडूला संघात घेत त्याला कर्णधारपदाची धुरा देईल याकडे क्रिकेटरसिकांचे लाख लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “भीम” पडद्यावर साकारणारे प्रवीण कुमार होते गोल्ड मेडलिस्ट
- ‘महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळेच…’; चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले
- आसाम मधील एका पत्रकाराला, प्रश्न विचारला म्हणून पोलिसांनी मारहाण केली.
- हा खेळाडू असणार रणजी स्पर्धेत मुंबई संघाचा नवीन कर्णधार…
- रोहित आणि विराटच्या वादावर सुनील गावस्करांचा नवीन खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
