🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आरसीबीचे सलामीवीर कर्णधार विराट कोहली(१२) आणि देवदत्त पडिक्कल(१७) लागोपाठ बाद झाल्यानंतर रजत पटिदार(३१) आणि ग्लेन मॅक्सवेल(२५) यांनी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर एबी डिव्हीलीयर्सने पटिदारसोबत अर्धशतकी भागिदारी करत आरसीबीचा डाव सावरला. एबीने आखेरच्या काही षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीने २० षटकात ५ गडी गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. एबी डिव्हीलियर्सने आरसीबीकडून ४२ चेंडुत ३ चौकार आणि ५ षटकारासंह सर्वाधिक ७५ धावा केल्या.
Match 22. It's all over! Royal Challengers Bangalore won by 1 run https://t.co/DMSHuJvhGn #DCvRCB #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
आरसीबीने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन(६) आणि स्टीव्ह स्मिथ(४) लवकर बाद झाले. तर पृथ्वी शॉ २१ धावावर बाद झाला. यादरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने मार्कोस स्टॉयनीस (२२) सोबत भागिदारी करत संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्यानंतर शिम्रॉन हेटमायर (५३) सोबत रिषभने आक्रमक फटकेबाजी करत सामना दिल्लीच्या बाजुने फिरवला. मात्र मोहम्मद सिराजच्या आखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडुवर ६ धावांची गरज असताना रिषभ पंत केवळ चौकार मारु शकला. आणि हातातोडाशी आलेला दिल्लीचा घास सिराजने काढुन घेतला. दिल्लीकडून रिषभ पंतने ४८ चेंडुत ६ चौकरासह सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर हेडमायरने धडाकेबाज फलंदाजी करत २५ चेंडुत २ चौकार आणि ४ षटकारासह ५३ धावांची वादळी खेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- पूर्ववैमनस्यातून दोन गटात फ्रि-स्टाईल हाणामारी
- युवा सेनेच्यावतीने घाटी रुग्णालयात अन्नदान, १ हजार गरजुंना मिळाला लाभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
