Share

शेतकरी अतिवृष्टीने हैराण असताना पुष्पवृष्टीने स्वागत करवून घेणाऱ्या जयंत पाटलांवर रयत क्रांती संघटनेची टीका 

Published On: 

नांदेड – एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र पक्षाचे कार्यकम धुमधडाक्यात करत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अश्याप्रकारे असंवेदनशील वागण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.

जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा कार्यक्रम एवढा मोठा आणि भव्यदिव्य झाला की यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील व मंत्री संजय बनसोडे स्वतःची पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत आहेत यांना राज्यातल्या शेतकऱ्याचं घेणेदेणे उरलेलं नाही.यांची संवेदनशीलता हरपली आहे अशी टीका रयत क्रांती संघटनेने केली आहे. राज्यात गेल्या वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनता परेशान असताना मंत्री मस्त अशी अवस्था आज राज्याची झालेली आहे. शेतकऱ्याला एक दमडीची मदतीची घोषणा न करता आपल्याच मोठेपणा करण्यात मशगुल असलेल्या मंत्र्यांना राज्यातील जनता येणाऱ्या काळामध्ये जागा दाखवेल अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!