Share

अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची टीका; म्हणाले,‘महिलाही पिल्या तरी…’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) टोला लगावला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना रावसाहेब दानवे म्हणाले की,‘अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही. पण वाईन आणि दारू मधला फरक अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही. उद्या ते असेही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील. मला असं वाटतं की याचं समर्थन कोणीही करू शकत नाही’, असे दानवे म्हणाले.

दरम्यान, वाईन आणि दारू यात जमीन असमानाचा फरक आहे. वाईन ही फळांपासून बनत असते. अनेक वर्ष आपल्या राज्यातील शेतकरी अशा फळांची पिके घेतात. काजू, द्राक्ष यापासून वाईन तयार केली जाते. या फळांची पिके आपल्या राज्यातील शेतकरी घेत असतात. अशी अनेक प्रकारची फळे आहेत, ज्यापासून वाईन तयार केली जाते. मात्र काहींकडून जाणीवपूर्वक ‘मद्यराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!