🕒 1 min read
जालना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ईडी कडून करवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर महाविकास आघडीच्या नेत्यांकडून भाजपवर आरोप होत आहेत. ‘इडी आणि सीबीआय खंजीर आहे, महाविकास आघाडीच्या पाठीत खुपसण्यासाठी’ असा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसायला भाजप ची गरज नाही. जसे आमच्या काळात शिवसेनेने राजीनामे खिशात ठेवले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर आहेत, असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले आहे.
तिघांच्या खिशात असलेले खंजीर कधी एकमेकांना खुपसले जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आमच्या खंजीराची गरज नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला आहे. त्याच सोबत ते पुन्हा सारवासारव करत म्हणाले की, पवार कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत, राजकीय वैचारिक मतभेद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत ९३ टक्के शाळांनी दहावीचे निकाल लावले, उर्वरित लवकरच लागणार!
- ‘दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’; मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटलांच मुख्यमंत्र्यांना पत्र
- सोयगाव शहरास गाळ मिश्रीत पाणी पुरवठा! रहीवाश्यांचे आरोग्य आले धोक्यात
- चितोडा प्रकरणातील निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची आझाद हिंद संघटनेची मागणी
- राहुल-प्रियांका यांनी लक्ष देवूनही वाद मिटेना; प्रदेशाध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरूनही धुसफूस सुरूच


