Share

चितोडा प्रकरणातील निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची आझाद हिंद संघटनेची मागणी

Published On: 

बुलडाणा: खामगाव तालुक्यातील चीतोडा अंबिकापुर येथील वैयक्तिक वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी या दोन्ही कुटुंबाला आझाद हिंद संघटनेचे संस्थापक ऍड. सतीषचंद्र रोठे यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली आणि त्या दोन्ही कुटुंबातील निर्दोष लोकांवरील गुन्हे कमी करण्याची मागणी केली.

चितोडा अंबिकापुर येथे दि. १९ जून रोजी विभिन्न समाजातील दोन कुटुंबात वैयक्तिक कारणावरून वाद झाला, यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र या वादाला काही राजकीय लोकप्रतिनिधी जातीय वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे जनतेने अशा वक्तव्यांना बळी पडू नये आणि शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आले आहे.

तालुक्यात झालेल्या या दोन कुटुंबातील वादामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली होती. मात्र आता ही परिस्थिती काही प्रमाणात निवळली असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आता या प्रकरणातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर प्रकरणातील निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!