🕒 1 min read
मुंबई : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा संघ विक्रमी ४७व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने उपांत्य फेरीत यूपीवर उत्तर प्रदेशवर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शनिवारी मैदान ओले असल्यामुळे पहिले सत्र खेळता आले नाही. दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचे मान्य केल्यावर मुंबईने ४ बाद ५५३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या तर यूपीचा संघ पहिल्या डावात १८० धावाच करू शकला. सामनावीर यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात १८१ धावा केल्या. आता २२ जूनपासून बेंगळुरू येथे होणार्या अंतिम फेरीत मुंबईचा संघ मध्यप्रदेश सोबत भिडणार आहे. मध्यप्रदेशने दुसऱ्या उपांत्य फेरीत बंगालवर १७४ धावांनी विजय मिळवला होता.
मुंबईने विक्रमी ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. २०१६-१७ नंतर संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. मुंबईने शेवटचे विजेतेपद २०१५-१६ मध्ये जिंकले होते. तेव्हा या संघाने अंतिम फेरीत सौराष्ट्रचा पराभव केला होता. उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दिवशी मुंबईने दुसऱ्या डावात ४ बाद ४४९ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सर्फराज खान २३ आणि शम्स मुलानी १० धावांवर नाबाद होते. संघाने डाव घोषित केला तेव्हा सर्फराज १०० चेंडूत नाबाद ५९ आणि मुलानी ८९ चेंडूत ५१ धावांवर खेळत होते. म्हणजेच दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती.
Mumbai vs Uttar Pradesh – Match Drawn Mumbai took first innings lead (Qualified) #MUMvUP #RanjiTrophy #SF2 Scorecard:https://t.co/U8VEi7t1Kh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 18, 2022
यूपीने दुसऱ्या डावात ९ गोलंदाज आजमावले. प्रिन्स यादवला २ तर शिवम मावी आणि सौरभ कुमारला प्रत्येकी एक बळी मिळाला. यशस्वीशिवाय हार्दिक तामोरेनेही मुंबईसाठी पहिल्या डावात ११५ धावा केल्या होत्या. याशिवाय शम्स मुलानीनेही ५० धावांचे योगदान दिले. त्याचवेळी यूपीकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. उत्तर प्रदेशकडून ९व्या क्रमांकावर उतरलेल्या शिवम मावीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. मुंबईसाठी तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
.@ybj_19 (181) & Armaan Jaffer (127) completed superb tons as Mumbai ended Day 4 of the @Paytm #RanjiTrophy #SF2 against Uttar Pradesh at 449/4. ???? ???? #MUMvUP
Watch the highlights ???? ????https://t.co/gAN6BmSogL pic.twitter.com/X4tpzCYjQ8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 17, 2022
मुंबईकडून दुसऱ्या डावात अरमान जाफरने १२७ धावा केल्या. म्हणजेच उपांत्य फेरीत त्याने एकूण ४ शतके झळकावली आहेत. मुंबईचे फलंदाज अंतिम सामन्यात आहे अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे मध्यप्रदेशचा संघ तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. शेवटच्या वेळी संघाने १९९८-९९ मध्ये जेतेपदाची फेरी गाठली होती. त्या सामन्यात त्यांचा कर्नाटककडून पराभव झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
