Share

Ramdas Kadam | “बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का?” रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

दापोली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले नेमकं रामदास कदम ?

मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?, असा खोचक सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला.त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलत होते.

पुढे रामदास कदम बोलताना म्हणाले की, आम्ही कधी नाही म्हटलं आहे का उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,असे अनेक सवाल कदमांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे.

परंतू रश्मी ठाकरे सगळीकडे दिसतात-

तसेच, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत. परंतू आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच, असं कदम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!