🕒 1 min read
जळगाव : काल(१२ मार्च)रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे (Sandip Devare) यांनी पिंपळनेर येथे आदिवासी दलित बहुजन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना रामदास आठवलेंनी शिवसेनेवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे, असा घणाघात आठवलेंनी केला. दरम्यान, आठवलेंच्या या टीकेवर आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्या अगोदर भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं बोलणं शोभत नाही’, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Breaking News : नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल; शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याचा वाद
- ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट कर मुक्त करावा; आमदार अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…
- मोदींच्या उत्सवात सामील झालेले लोकं सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात- संजय राऊत
- संजय राऊतांच्या टीकेवर राज ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांनी आता एकांतात…”
- ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन झालं..मराठी मोठी सिनेसृष्टीवर शोककळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
