Share

‘राज्यपाल भवन भाजपा कार्यालय झालं आहे’, कॉंग्रेसचा आरोप

Published On: 

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषेदत १२ आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी अजूनही १२ आमदारांची नियुक्ती केलेली नाहीये. यावरूनच कॉंग्रेसने राज्यपालांवर निशाना साधला आहे. भाजपा सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट थांबवण्यासाठी राज्यपालांचा वापर सुरू आहे. अनेकदा विधानसभेतही म्हटलं आहे की राज्यपाल भवन आता भाजपा कार्यालय झालं आहे. मागच्या काळात भाजपाने मोठ्या प्रमाणात नेत्यांना आयात करुन ठेवलं आहे. भाजपाचे काही आमदार आहेत, त्यांनाही वाटतंय की आता आपण काय मंत्री होणार नाही. त्यामुळे तेही फुटणार आहेत. असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाचे असतील. म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे. असे विधानही त्यांनी यावेळी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!