🕒 1 min read
हातकणंगले :महाविकासआघाडीतून आपण बाहेर पडत असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
महाविकासआघाडी सरकारची सत्ता स्थापन झाल्यापासून राजू शेट्टी आणि त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीचा एक प्रमुख घटक होता.
महाविकासआघाडीच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात वेळोवेळी शेट्टी यांनी सरकारवर उघड नाराजी व्यक्त केली केली होती. चोकाक तालुका हातकणंगले येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत शेट्टी म्हणाले, “महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत या प्रस्तावाचा सूचक मी होतो. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये घटक पक्षांना कुठेच विचारात घेतले नाही. शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंज्य मदत केली. शेतकऱ्यांची फसवणूक केली. वेळोवेळी केलेल्या आमच्या मागण्या सरकारने विचारात न घेतल्याने आम्ही बाहेर पडत आहोत. “
दरम्यान फेसबुक पोस्ट करत शेट्टी म्हणाले,” विचारायचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन, कुठल्याही सभागृहात जाण्यात रस नाही. माझ्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे. आहेत.”
महत्वाच्या बातम्या :
“…तर लोक नागडं करून मारतील…”, संजय राऊतांचा INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना इशारा
सोमय्यांनी ‘विक्रांत’साठी जमवलेला पैसा गेला कुठे ?
IPL 2022: शानदार विजयानंतर कर्णधार फाफने केले कार्तिकचे तोंड भरून कौतुक; म्हणाला ‘संघाला त्याची गरज…’
“काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर आता INS विक्रांत फाईल पाहा”, राऊतांचा मोदी-शाहांवर निशाणा
अंशुमन विचारेला एप्रिल फूल पडले महागात, ‘त्या’ पोस्ट वरून पत्नीला मागावी लागली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
