Share

‘तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार’, राज्य सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मोदी सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळून मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खेलरत्नमधून नाव वगळल्याने काँग्रेसची भाजपवर ही कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

भारतात माहिती विकास तंत्रज्ञानात राजीव गांधी यांनी महत्वाचे बदल केले. यामध्ये त्यांची भूमिका अग्रगण्य राहिली. त्यांच्या तंत्रज्ञान विकासातील योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन म्हणून राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.

या वर्षी राजीव गांधी यांच्या २० ऑगस्ट जयंतीरोजी पुरस्काराची घोषणा केली जाईल. तर ३१ ऑक्टोबरपूर्वी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यानुसार पुढील वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्टला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आतापर्यंत राजीव गांधी यांची जयंती ‘माहिती तंत्रज्ञान दिन’ म्हणून साजरी केली जात होती. यापुढे त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!