Share

राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत म्हणाले, ‘महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा’

Published On: 

🕒 1 min read

जयपूर:- राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. भाजप सरकार पाडण्याचा कट रचत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना अशोक गहलोत म्हणाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली आहे. काँग्रेसची पाच सरकारं पाडली आहेत. आता सहावं सरकार पडणार आहे, असं चहा-नाश्ता करत असताना अमित शहा आमदारांना म्हणाले, असा आरोप गहलोत यांनी केला आहे. तसंच धर्मेंद्र प्रधान हे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी न्यायाधीशांशी चर्चा करण्यासंदर्भात बोलले. अमित शहा यांनी आमच्या आमदारांसोबत एक तास बैठक घेतली होती आणि पाच सरकारं पाडल्यानंतर सहावं देखील पाडण्यात येईल असं ते आमदारांना म्हणाले, असा दावा गहलोत यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी देखील अशोक गहलोत यांनी भाजपवर राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!