🕒 1 min read
पुणे : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीने साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी देखील साधेपणाने हे सण साजरे केले.
नुकत्याच झालेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी देखील वारकरी मंडळींनी पंढरपूरला जाणे टाळले. आता कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढचे 10 दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं घेतला आहे.
कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या ३ दिंड्यांसमवेत प्रत्येकी केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संजीवन समाधी सोहोळ्याला वारकऱ्यांनी गर्दी करु नये, म्हणूनही काही ठराविक मान्यवरांना पास देण्यात येत आहेत. आगामी 14 तारखेपर्यंत माउलींच्या संजीवन समाधीचा सोहोळा चालणार असल्यानं 16 तारखेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान उंचावली – भरणे
- ‘स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जाते’, राऊतांचा भाजपवर घणाघात
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस

