Share

Raj Thackeray | “होय! विदर्भाकडे माझं दुर्लक्ष झालं, मात्र…”, राज ठाकरेंनी दिली कबुली

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवार आणि सोमवारी नागपूर येथे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं असून विदर्भकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

राज ठाकरे यांनी दिली कबुली :

पत्रकार परिषदमध्ये मनसेची पदं बरखास्त करण्याची वेळ आली म्हणजे तुमचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का?, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उघडपणे याबाबत कबुली देत, होय माझ्याकडून आमच्या सहकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं. मात्र, यापुढे असं होणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नागपूरमधील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण:

नागपूरमधील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण राज ठाकरेंनी यावेळी दिलं आहे. नागपूर मध्ये काही चुकीची काम सुरू होती. पक्षाला सोळा वर्षे झाली मात्र त्यामानाने अपेक्षित पक्ष वाढीचं काम नागपूर मध्ये झालेलं नसल्यामुळे पदं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत, महत्त्वाची पदे आहेत ती बरखास्त करत आहे, घटस्थापनाच्या दिवशी नवीन कार्यकारणी जाहीर करेल, आता 27 सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक होणार असून 28 तारखेला आमचे काही नेते नागपूर मध्ये येतील आणि नवरात्रीनंतर मी कोल्हापूर मार्गे कोकण दौरा करणार असून दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!