Share

Nitin Deshmukh | “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, हे सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

Published On: 

🕒 1 min read

अकोला : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत गुवाहटीला नेले होते. त्यावेळी राज्यातील राजकारणामध्ये खूप उलाढाल झालेली पाहायला मिळाली. गुवाहटीला गेलेल्यांपैकी शिवसेनेचे नेते नितीन देशमुख हे एकमेव होते, तिकडून आल्यानंतर जे उद्धव ठाकरेंकडे परत गेले. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती करून महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नितीन देशमुख ?

महाराष्ट्र राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असं नितीन देशमुख म्हणाले आहेत. काल म्हणजेच रविवारी अकोला जिल्ह्यामध्ये एका सभेला नितीन देशमुख उपस्थित असून, त्यावेळी ते बोलत होते.

मी सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे –

पुढे ते बोलताना असंही म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होतं. हे षडयंत्र आताचे नव्हते. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे.

ज्या लोकांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या सर्वांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील त्यासर्व क्लीप बाहेर काढणार असल्याचं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!