Share

विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय; पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेतेलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. सध्याची या स्थितीमुळे पुढील काही दिवस दक्षिण कोकणातील काही भागासह घाट परिसर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

नुकतेच आयएमडीने महाराष्ट्रासाठी 26-30 ऑगस्टसाठी हवामान चेतावणी जारी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केली केला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून पुण्यात देखील पावसानं उघडीप घेतली असल्याचे पहायला मिळाले. गेले काही दिवस पाऊस नसल्याने पुण्यात काही प्रमाणात तापमान देखील वाढले होते. यामुळे हवामानात बदल जाणवला होता. परंतु काल पासून पुण्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!