Share

कृषी कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली: मागील वर्षापासून तीन कृषी कायदे करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र आज सकाळी ९ वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच यावेळी मोदींनी देशाची माफीही मागीतली आहे.

कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा आक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आता आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. यावर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय किसान!’, असे म्हणत शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!