🕒 1 min read
नवी दिल्ली: बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यानं केलं होतं.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले होते, गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलंय. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि करोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही. लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून गरीबांची संख्या वाढत आहे. युपीए सरकारने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं होतं. मोदी सरकारने २३ कोटी लोकांना परत गरिबीमध्ये ढकललं आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी को एक भारत में दो भारत नजर आना स्वाभाविक है क्योंकि उनका पालन पोषण दो संस्कृतियों में हुआ है मां सोनिया गांधी इटालियन थी और पिता राजीव गांधी भारत के थे । इटली और भारत की संस्कृति में पल कर बड़े हुए हैं वह । उनकी सोच में हमेशा द्वंद रहा है।
— Anil Vij Minister Haryana, India (@anilvijminister) February 3, 2022
राहुल गांधी यांनी केलेल्या दोन भारतच्या व्यक्तव्यवरून भाजप (BJP) नेत्यानी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. अनिल विज म्हणाले, राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारताचे होते. त्यामुळे ते इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो, असं विज यांनी ट्विटमध्ये म्हणलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
समांथाच्या Tattoo शी नागा चैतन्यचं खास कनेक्शन, नातं तुटलं मात्र…
-
कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान
-
…तर सुप्रिया सुळे यांनी माझे आव्हान स्वीकारावे – बंडातात्या कराडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
