Share

२०१४ मध्ये संघावर केलेली टीका राहुल गांधींना भोवली

Published On: 

ठाणे : भिवंडी येथील प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आरोप केल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुढील सुनावणीला हजर रहाण्याचेच आदेश भिवंडी न्यायालयाने आज दिले. या संदर्भात २३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काल झालेल्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर असल्याने त्यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. त्यामुळे पुढील सुनावणी वेळी राहुल गांधींना हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात ६ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!