Share

एबीजी शिपयार्ड लि. घोटाळ्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बडे उद्योगपती सार्वजनिक तसेच खाजगी बँकांना फसवून परदेशात पलायन करण्यास यशस्वी झाले आहेत. या बँक फसवणुकीवरून केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अनेक आरोप- प्रत्यारोप झाले आहेत आणि होत आहेत.

नुकताच देशात अजून एक बँक घोटाळा समोर आला आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर या घोटाळ्यावरून टीका केली आहे. मोदी यांच्याच संमतीने एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1492820754370633730?s=20&t=mqgtb70OsrxoJ_vi0SiRqA

 

मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही, आणि यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था डबघाईला आली असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.  स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप मधील बँकांना एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष अगरवाल आणि त्यांच्या साथीदारांनी २२८४२ रुपयांना फसवल्याचा आरोप सध्या होत आहे. आणि या सर्व भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे अशी टीका आज राहुल गांधी यांनी ट्विटर वरून केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!